भिरवंडे खलांतर येथील मधुश्री सावंत यांचे निधन…!

कणकवली : तालुक्यातील भिरवंडे खलांतरवाडी येथील मधुश्री महादेव सावंत (वय ७५) यांचे दि:१३  फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. भिरवंडे गावचे गाव पुरुष माजी सरपंच महादेव उर्फ आबा सावंत यांच्या पत्नी होत. माई या नावाने त्या परिचीत होत्या.

कनेडी बजारपेठेतील रिक्षा चालक लक्ष्मण सावंत यांच्या त्या आई होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावत हळहळ व्यक्त होत आहे.