संघ, भाजपाच्या विचारधारेवर बोलताना प्रकाश आंबेडकरांचं महत्त्वाचं विधान..!

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. या नव्या प्रयोगामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे. आगामी काळात संघ, भाजपाने आपल्या विचारधारेत बदल केला, तर चर्चा करण्यास हरकत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरं देत होते.