रिंकू सिंगचा शेवटच्या बॉलवर षटकार, भारताची ऑस्ट्रेलियावर मात.! ; पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात कांगारुंना धुतले.!

124

विशाखापट्टनम : भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील  पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाला आज चांगलेच पाणी पाजले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे झालेल्या पहिल्या टी -20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला मात दिली. तब्बल 208 धावांचे लक्ष देऊनही ऑस्ट्रेलियाच्या पदरी पराभव आला आहे. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन यांनी शानदार अर्धशतके झळकावली. तर रिंकू सिंगने जबरदस्त फलंदाजी करत शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.