समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवा! ; न्यायालयात याचिका दाखल; राज्य सरकारला नोटीस!

41

नागपूर :  वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्तास थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातामुळे जास्त चर्चेत आला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असते. समृद्धीवर सुरक्षीततेच्या उपाययोजना कराव्या तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटलं?

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासूनच समृद्धीवर अपघात होत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या. समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत, ४ आठवड्यांच उत्तर देण्याचे खंडपीठाने सरकारला आदेश दिले आहेत.

  • तज्ञांचे पॅनल तयार करावे
  • चिन्ह लावावी
  • प्राथमिक उपचार केंद्र सुरु करावी.
  • न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावली आहे. तसेच ४ आठवड्याच उत्तर मागितले आहे.