BREAKING NEWS – चौकार-षटकारांचा पाऊस.! ; जैस्वालचे धमाकेदार अर्धशतक, पण पुढच्या चेंडूवर खेळ खल्लास.

37

तिरुवनंतपुरम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात किती अप्रतिम सुरुवात केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण पुढच्या चेंडूवर तो आऊट झाला. जैस्वालने 25 चेंडूत 53 केल्या. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन एलिसने त्याला अॅडम झाम्पाकडून झेलबाद केले.