CRICKET – वर्ल्ड कपपूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूची एंट्री? ; कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य..!

28

त्रिनिदाद : सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा संघाला आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. मात्र या मोठ्या स्पर्धांपूर्वी संघातील अनेक मोठे खेळाडू जखमी झाले आहेत.

परिणामी, विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत संघाचे संयोजन निश्चित होत नाही आणि या मोठ्या स्पर्धांसाठी संघ तयार नसल्याचा अंदाज लावता येतो. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टीममधील एका खेळाडूबाबत मोठे अपडेट दिले आहेत. या खेळाडूच्या विश्वचषकातील सहभागावर अजूनही शंका कायम आहे.

विश्वचषकाला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र या स्पर्धेपर्यंत स्टार फलंदाज श्रेयस अय्यर फिट होईल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. अय्यर विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर विश्वचषकापर्यंत अय्यर तंदुरुस्त होईल, असे मानले जात आहे. आता संघाचा कर्णधार रोहित शर्मानेच अय्यरच्या दुखापतीवर मोठे वक्तव्य केले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान अय्यरबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, श्रेयस अय्यर परतीच्या मार्गवर आहे. रोहितच्या वक्तव्यावरून काहीही स्पष्ट झाले नाही पण अय्यर पुन्हा फिटनेस मिळवू शकतो याचा अंदाज लावता येतो. अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, श्रेयस अय्यर त्याच्या दुखापतीतून बऱ्यापैकी बरा झाला आहे, पण त्याला मॅच फिट होण्यासाठी वेळ लागेल, त्यामुळे तो आशिया कप 2023 मधून बाहेर पडू शकतो. पण अय्यर जर आशिया कप खेळला नाही तर त्याचे थेट विश्वचषकात उतरणे अत्यंत घातक ठरू शकते. प्रदीर्घ काळ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अय्यरसाठी विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण संघाला आतापर्यंत त्याच्यासाठी चांगला बदली खेळाडू शोधता आलेला नाही.याशिवाय आगामी विश्वचषकाबाबतही रोहितने मोठे वक्तव्य केले आहे. आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकण्याची गरज आहे, इतर कोणत्याही वर्षीप्रमाणे भारतासाठी ट्रॉफी जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. टीम इंडियाने 2013 पासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही.